खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये आज बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.