जालना: दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शांतिनिकेतन शाळेने शहरात नावलौकिक केले : आमदार अर्जुनराव खोतकर
Jalna, Jalna | May 18, 2026 1995 साली मी आमदार असतानाच शांतिनिकेतन शाळेचा प्रस्ताव माझ्या समोर आला. अनेकांना सहकार्य करतो तसेच संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी आणलेल्या या प्रस्तावाशी मी सहकार्य केले. परंतु आज शाळेची प्रगती पाहता शाळेने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन जालना शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सोमवार दि. 18 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शांतिनिकेतन शाळेतील दहावी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.