जालना: शंभर मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांचे आवाहन
Jalna, Jalna | Jun 11, 2026 घनसावंगी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांनी केले आहे. किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून उगवण चांगली होईल आणि दुबार पेरणीची वेळ येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यंदा खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीच्या तयारीत असले तरी पावसाचे प्रमाण अद्याप अपुरे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, तालुक