जालना: निकष बदलून सरसकट कर्जमाफी द्या; शेतकरी विकास मंचाचे जालना तहसील कार्यालयावर निवेदन
Jalna, Jalna | Jun 16, 2026 शेतकरी विकास मंच महाराष्ट्रच्या वतीने जालना तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करून राज्यातील सर्व शेतकर्यांना 100 टक्के सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.