जालना: धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, धावडा येथे 252 क्विंटल धान्यसाठा केला जप्त
Jalna, Jalna | Jul 4, 2026 आज दिनांक 4 जुलै 2026 वार शनिवार रोजी सकाळी 8:30वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून यामध्ये जालन्याच्या धावडा येथे3 जुलै रोजी सार्वजनिक व्यवस्थेतील गहू ज्वारी तांदूळ व इतर धान्य एकूण 252 क्विंटल अनाधिकृतपणे साठवून ठेवलेला धान्यसाठा जिल्हा पुरवठा प्रशासन व पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माणिक यांच्या टीमने जप्त करत 4जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.