राज्य राखीव बलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षाला प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण देण्याकरिता राज्यात एकमेव केंद्र असून ते दौंड जि. पुणे येथे आहे. त्याची क्षमता मर्यादीत असून सध्याच्या स्थितीत दुसरे केंद्र देणे अपेक्षित आहे. हे केंद्र वर्ध्यात देण्यात यावे, अशी मागणी वर्ध्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.