वर्ध्यातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱ्या एका महिला पर्यवेक्षिकेनं आता थेट आत्मदहनाचा पवित्रा घेतला आहे. खरांगणा येथील स्वालंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत, मात्र प्रशासनाच्या थंड प्रतिसादामुळे त्यांनी आता टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. असे आज 25 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे