जामठा स्टेडियमवर सुरू असलेल्या टी 20 सामन्यामध्ये सलामीवीर अभिषेक शर्माचे धडाकेबाज अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या 'फिनिशिंग टच'च्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात विक्रमी धावसंख्या उभारली आहे. भारताने निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २३८ धावा केल्या असून, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धची ही भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.