हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जोरदारपणे उपस्थित केला. सरकारने काही कर्मचाऱ्यांना नियमित केले असले तरी उर्वरित कर्मचाऱ्यांचे समायोजन अजूनही प्रलंबित असून अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी ठेवणे हा गंभीर अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील अनेक रुग्णालये स्टाफअभावी बंद राहतात, तर डॉक्टरांची कमतरता इतकी वाढली आहे की ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत आरोग्यव्यवस्था भयावह स्थिती