अंजनी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणाकरिता मेहकर येथे येतात, त्यामध्ये कामगार शेतकरी शेतमजूर यांचीच मुले असून घरच्या आर्थिक कारणामुळे त्या विद्यार्थ्यांना किरायाने खोली करणे शक्य होत नसल्याने सर्व विद्यार्थी बस द्वारे ये जा करतात अंजनी वरून 9:30 वाजता मेहकर कडे बस आहे मात्र ही बस सर्व प्रवाश्यासाठी असल्याने सदरच्या बस मधे प्रमाणाच्या बाहेर प्रवासी व विद्यार्थी यांची गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना बस मधे प्रवास करणे शक्य होत नाही. बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे केली आहे.