समुद्रपूर: शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची तातडीने नोंदणी करून घेण्याचे तहसीलदार कपिल हाटकर यांचे आवाहन
समुद्रपुर राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवडा राबिण्यात आहे समुद्रपुरचे तहसिलदार कपिल हाटकर यांनी ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेघश्याम ढाकरे यांच्या बांधावर जावून प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. राज्य शासनाने ई-पीक पाहणीचे धोरण अवलंबिले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.१०० टक्के शेतकरी नोंदणी करुन द्यावे असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे.