कन्नड तालुक्यात मे ते सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस आणि बेमोसमी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाच्या निर्देशानुसार संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई प्रक्रियेला गती दिली. आतापर्यंत ६१,६५९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चालू वर्षातील अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्यात आले असून १,१२४ लाभार्थ्यांचे काम प्रगतीपथावर आहे.