शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांनी डोके वर काढले असून, कुख्यात गुंड अबू खान आणि त्याच्या टोळीने एका बारमालकाकडे खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दिघोरी नाका परिसरातील एका बार चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.