आकापूर येथील शेतकरी वासुदेव सितकुरा वेठे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर परिसरात निर्माण झालेल्या भीतीने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री बेरात्री वाघाची भ्रमंती सुरू असल्याने नागरिक दहशतीमध्ये जिवन जगत आहेत. त्यामुळे आज दि 28 ऑक्टोबर ला 12 वाजता शेकडो शेतकरी, शेतमजूर आणि महिला यांनी तळोधी(बा.) वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक दिली.