शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा आणि त्यांना त्यांच्या हक्काचा भाव मिळावा, यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने ठाम भूमिका घेण्यात आली आहे. दिग्रस येथील बाजार समितीत शेतीमालासाठी हमीभावानुसार खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आज दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. यासंदर्भात दिग्रसचे तहसीलदार आणि बाजार समितीचे सचिव यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पणनमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.