जालना: जालना जलकवच अभियानांतर्गत बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा; शेती उत्पन्न वाढीचा दिला सल्ला
Jalna, Jalna | Jun 17, 2026 जालना जलकवच अभियान - 2026 व आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत आज पंचायत समिती सभागृह, बदनापूर येथे रेशीम शेती विषयक कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. बुधवार दि. 17 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वजाता मिळालेल्या माहितीनुसार जलसुरक्षा, पीक विविधीकरण व शेतकरी उत्पन्नवाढ या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जलकवच अभियान राबविण्यात येत आहे.