पालघर: पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत विक्रमगड येथे 24 सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन
राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत विक्रमगड येथे 24 सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्याचे, प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारास उपस्थित राहावे असे आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.