अहिल्यानगरची ऐतिहासिक ओळख मानली जाणारी माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय महापालिकेच्या आयुक्तांनी घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा निर्णय अतिशय चुकीचा व शहराच्या इतिहासावर घाव घालणारा असल्याची जोरदार टीका सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केली आहे. “जर आयुक्तांमध्ये खरोखर हिम्मत असेल, तर शहरातील इतर विकास अडवणाऱ्या, जीर्ण, पुरातन इमारती आधी पाडून दाखवा; मगच वेशीचा विषय काढा!” असे भुतारे यांनी ठणकावले.