अतिवृष्टीमुळे राजुरा तालुक्यासह कोरपना, जीवती,गोंडपिपरी येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके कोमेजली, तर काही ठिकाणी पूर्णपणे उखडून गेली. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न कोसळले त्यातच शासनाकडून सुध्दा मदत मिळाली नाही त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही अनेकांच्या घरात उदास वातावरण आहे.दिवाळी गेली तरी मदत न कळल्याने त्यांना तात्काळ मदतीची मागणी जयभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी आज दि 28 ऑक्टोबर 12 वाजता प्रशासनाकडे केली आहे