समुद्रपूर: निरोगी आरोग्यासाठी विषमुक्त आहार काळाची गरज: सावंगी येथे मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे याचे प्रतिपादन
दिवसेंदिवस मानसाच्या गरजा वाढत चालल्या असुन या आर्थिकरीत्या पुर्व करण्यासाठी शेतकरी अधिक उत्पादनाच्या लोभात मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर करीत आहे.यामुळे याचा जमिनीवर परीणाम होतच आहे तर मनुष्याला सुध्दा विषयुक्त आहार मिळत आहे असे मत आज शनिवारी ४ मेला ५ वाजता गिरड येथील मगन संग्रहालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जैविक शेती विषमुक्त अभियान शेतकरी चावळी बैठकीत मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांनी व्यक्त केले.