हिंगणघाट:महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर करण्यात आलेल्या विहिरींचे बांधकाम पूर्ण करूनही गेल्या दोन वर्षांपासून अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हे रखडलेले अनुदान तात्काळ वितरित करावे, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री डॉ पंकज भोयर याच्या द्वारे दिलेल्या निवेदनातून केली आहे.