होत्याचे नव्हते झाले! स्वतःची दीड एकर आणि बटाईने घेतलेल्या जमिनीतील सोयाबीन मध्यरात्री जळून खाक; गोताळा येथील शेतकऱ्यावर आभाळ कोसळले : नियतीने आणि माणसाच्या क्रूरतेने घात केल्याची एक हृदयद्रावक घटना अहमदपूर तालुक्यातील गोथळा येथे घडली आहे. व्यंकटी सागर कोदळे (रा. गोताळा, ता. अहमदपूर) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.