जालना: निराधार महिलांसाठी ‘शांतीकुंज’ ठरतेय आधारवड; लाभ घेण्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आवाहन..
Jalna, Jalna | Apr 16, 2026 निराधार महिलांसाठी ‘शांतीकुंज’ ठरतेय आधारवड; लाभ घेण्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आवाहन.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक कलह, सामाजिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे निराधार व संकटग्रस्त झालेल्या महिलांसाठी जालन्यातील शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृह आशेचा किरण ठरत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत या राज्यगृहाचे प्रभावीपणे संचालन करण्यात येत असून, गरजू महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात