भुसावळ शहरात अमृत योजनेच्या पाणी टाकीचे काम बंद पडण्यावरून भाजप आणि सत्ताधारी यांच्यात जुंपलेली असतानाच, आता माजी आमदार संतोष चौधरी यांनी या वादात उडी घेऊन खळबळजनक दावे केले आहेत. "भाजप नगरसेवक केवळ स्टंटबाजी करत असून, यामागे काही लोकांचे मोठे हितसंबंध दडलेले आहेत. लवकरच या पडद्यामागच्या चेहऱ्यांचा बुरखा फाडणार," असा इशारा चौधरी यांनी बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत दिला आहे.