वर्धा जिल्हा पोलीस दल आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी 'ऑपरेशन निशाणा' हे धडाकेबाज अभियान राबवले असे आज 19 जानेवारी रोजी सायंकाळी पत्र परिषदेमध्ये सांगितले असल्याचे रात्री10वाजता प्रसिद्धीस दिले.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ या ४८ तासांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांची माहिती.