महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) हजारो कर्मचाऱ्यांच्या आणि ८४ लाख ग्रामीण कुटुंबांच्या भवितव्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे आज दि १७ डिसेंम्बर ला १२ वाजता केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. 'उमेद'मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदारांनी थेट केंद्रीय स्तरावर हा प्रश्न मांडला असून, यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.