जालना: जनगणना प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; गायत्री नगरातील काही घरांची नोंदच नाही? जनगणनेतून काही घरे वगळल्याचा दावा
Jalna, Jalna | Jun 19, 2026 जालना शहरातील गायत्री नगर परिसरातील काही घरे जनगणना व घरगणना प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रकाराची दखल घेत नागरिकांनी जालना महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊन तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जनगणना व घरगणना करताना काही घरांची नोंदच घेण्यात आलेली नाही.