महाराष्ट्राला संतांची आणि मंदिरांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही मंदिरे आणि देवस्थाने आपल्या संस्कृतीचे आणि श्रद्धेची जागृत केंद्र आहेत. त्यांचे केवळ आध्यात्मिक महत्त्व नाही; तर ती सामाजिक समरसतेची प्रमुख आधारस्तंभ आहेत. मंदिरांचे व्यवस्थापन, नित्यपूजा, दिवाबत्ती आणि उत्सव अविरतपणे सुरू राहावेत, या उदात्त हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सामान्य भाविकांपर्यंत अनेकांनी देवस्थानांना जमिनी दान दिल्या; त्या जमीनीचे सरंक्षण करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.