महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.हवामान बदलामुळे विविध आजारांची शक्यता वाढली आहे. ताप, अंगदुखी, डोळे दुखणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छतेची सवय जोपासून डासांची उत्पत्ती थांबवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन आज दि 30 ऑक्टोबर ला 12 वाजता मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.