स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागृतीसोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. अलीकडच्या काळात ईलेक्ट्रॉनिक माध्यमासोबतच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. असे असले तरी मुद्रीत माध्यमाचे महत्व अद्यापही अबाधित आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी केले.