नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित 'जनसंवाद' कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांबाबत आणि तक्रारींबाबत निवेदने सादर केली.जनसंवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी स्वतः प्रत्येक नागरिकाशी संवाद साधला, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांच्याकडील निवेदने स्वीकारली.