धुळे येथील जवाहर मेडिकल फाऊंडेशनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गौर गोपाल दास महाराज यांनी सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे वाढणाऱ्या मानसिक समस्यांवर भाष्य केले. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी त्यावरील झगमगाटामुळे अनेकजण स्वतःची तुलना करत नैराश्याकडे झुकत आहेत, असे त्यांनी सांगितले. शारीरिक आजारांवर उपचार घेतो, पण मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्मार्टफोन वापरताना विवेकबुद्धी ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला.