हिंगोली आज दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजता ईसापुर धरणाच्या सांडव्याची तीन वक्रद्वारे दहा सेंटिमीटर उघडण्यात आली असून सद्यस्थितीत पेनगंगा नदी पात्रात 1 हजार 734 क्युसेसने इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदीकाठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी माहिती आज रात्री नऊ वाजता जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.