हर घर जल हर घर नल या घोषणेसह केंद्र सरकारने जल जीवन मिशनचा मोठ्या प्रमाणावर उदो उदो केला मात्र जिल्ह्यात एकही योजना पूर्णत्वास न येता तब्बल साडेचारशे पेक्षा अधिक कामे निधी अभावी कंत्राटदारांनी अर्धवट सोडल्याने त्याचा प्रचंड मनस्ताप आता सरपंचांना सहन करावा लागत आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे जलजीवन नव्हे हे तर जल मरण मिशन ठरल्याची प्रतिक्रिया सरपंचांकडून उमटू लागल्या आहेत जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र असून काही ठिकाणी टाकी उभी झाली विह