भाजपच्या हुकूमशाहीने महाराष्ट्रावर भ्रष्टाचाराचा कलंक लावला आहे. १७,००० कोटींचा अटल सेतू दोन वर्षांत निकृष्ट ठिगळे दाखवतो.कामाचा दर्जा शून्य असतानाही, २५० रुपयाचा टोल बळजबरीने वसूल करणे, ही राजकीय दरोडेखोरी आहे. जनतेच्या पैशाची ही लूट जनता आता सहन करणार नाही.असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी २३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता व्यक्त केले आहे.