ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून छोटे-छोटे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. बुधवार दि. 11 मार्च 2026 रोजी सायं. 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना शहरातील डॉ.फ्रेझर बॉईज हायस्कूल येथे ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार व पारंपरिक उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री शिबिर ’जानकी महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.