रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात रविवार दि. 4 जानेवारीला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता पर्यंत आयोजित जनता दरबारात उपस्थितांच्या विविध समस्या ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. नवीन वर्ष 2026 च्या जानेवारी महिन्यातील हा पहिला जनता दरबार होता. त्यामुळे त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. यावेळी मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधत जनतेच्या अडीअडचणी समजून घेतल्या.