वाशिम शहरातील नगरपालिके मध्ये आत्तापर्यंत प्रस्थापित पक्षांनी तसेच नेत्यांची सत्ता आल्याने प्रस्थापिताने सर्वसामान्यांसाठी कोणतेही कार्य केले नाही, आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी उलेमाले फॉर्म येथे वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव नितीन उलेमाले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत व्यक्त केले.