चामोर्शी: धक्कादायक..काशीपूर येथे दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांना विषबाधा.. एकाचा दुर्दैवी मृत्यू
चामोर्शी तालुक्यातील मौजा-काशीपूर/अंकोला (कुनघाडा) येथे नळाची पाइपलाईन फुटल्याने नालीतील दूषित पाणी नळाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचले. हे पाणी पिल्यामुळे गावातील सुमारे ५० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून, दुर्दैवाने १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जवळपास ३० जणांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.