आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या दोन वारकऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मंगळवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आळंदीतील चाकण चौक परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेसह दोन संशयितांना अटक केली.