यवतमाळ: जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे अंतर्गत ५ जणांवर करण्यात आल्या प्रतिबंधात्मक कारवाया
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.यातूनच दिवसा व रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.याशिवाय सराईत गुन्हेगार मटका बहाद्दर जुगारी व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या वर कारवाया करण्याचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे.याचाच एक भाग म्हणून 14 सप्टेंबरला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.