जल जिवन मिशन आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यांचे देयके मिळत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायती अडचणीत आलेल्या आहेत. त्यामधून मार्ग निघावा म्हणून 1 जानेवारी 2026 रोजी जिल्हा सरपंच संघटने तर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सरपंच संघटने चे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, संघटनेची सल्लागार गंगाधर परशुरामकर आणि जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.