धुळे तालुक्यातील दह्याणे येथे ५ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या विवाहात वधू अल्पवयीन असल्याचे उघड झाल्यानंतर तब्बल ३१८ दिवसांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ग्रामपंचायत अधिकारी दिग्विजय ठाकरे यांनी १९ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीनुसार नवरदेवासह पाच जणांवर बालविवाह प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. उशिरा का होईना, पण कायदेशीर कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून तपास PSI खलीदा सैय्यद करत आहेत.