स्वच्छतेमुळे शहराची समृध्दीकडे वाटचाल सुरु झालेली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही स्वच्छता कर्मचार्यांच्या जीवनात अपेक्षित बदल झालेला दिसत नाही. कोरोनासारख्या कठीण काळात जेव्हा सर्वजण घरात होते, तेव्हा पोलीस आणि स्वच्छता कर्मचार्यांनीच रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी सोमवार दि. 9 मार्च 2026 दुपारी चार वाजता दिलेत.