जालना जिल्ह्यातील परिस्थिती ही भयावह आहे. जिल्ह्यात होणारे खून, गुन्हे यामुळे जनता भयभीत झालेली असून बीडच्या लोकांनी नाकरलेल्या नेत्याला जालनेकांना पालकमंत्री म्हणून थोपविले आहे. बुधवार दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी पक्षाचे 5 आमदार असूनही त्यांना पाकलमंत्री पद दिले नाही. त्यामुळे स्थानिक आमदारामधूनच पालकमंत्री नेमावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे फेरोज बागवान यांनी केली. खरं तर लोकांनी निवडून दिलेल्या आमदारामधूनच पाकलमंत्री नेमावा लागतो.