शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि हायवेवर गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. ही गंभीर बाब लक्षात घेता, पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. हायवेवरील अंधारामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) हे पथदिवे तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.