जिल्ह्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पहावयास मिळाली सुरुवातीला पावसाचा विलंब व नंतर तीन-चारदा शेतकऱ्यांना अतीवृष्टीचा सामना करावा लागला यामुळे खरिपातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता मात्र आता रब्बी हंगामाने दिलासा दिला असून जिल्ह्याने रब्बी पेरण्याचे उद्दिष्ट ओलांडले आहे जिल्ह्यात रब्बीतील पेरणी पूर्णत्वास आली आहे रबीने शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत केल्या आहेत कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 23 हजार 622 हेक्टर आहेत