राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल व वन विभागामार्फत जाहीर केलेला शासन निर्णय हा फसवा, अपुरा आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा आहे, असा तीव्र निषेध मेहकर येथे नोंदविण्यात आला.मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला.