जिल्ह्यातील मंदिरातील मूर्ती विटंबनेच्या घटनेला 4 दिवस उलटले तरीही पोलीस प्रशासनाच्या हाती अद्याप कोणताही धागादोरा लागलेला नाही. "आरोपी शोधणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार?" असा थेट सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. एकीकडे मंदिराला कुलूप असल्याने भाविकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे गुन्हेगार मोकाट असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.