मुंबई: गृहमंत्री फडणवीस यांना माणूस व कुत्र्यामधील फरकही समजेना टिळक भवनमधील परिषदेत काँग्रेसचे नाना पटोले यांची टिका
Mumbai, Mumbai City | Feb 9, 2024
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शुक्रवार, (ता.9) फेब्रुवारी रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील” असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का?